June 2014 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

26 June 2014

सुसज्ज व्हा यशस्वी व्हा! - Get Ready to Get Success

नमस्कार मित्रांनो
बॉर्न टू विन प्रस्तुत सहा तासांची जबरदस्त प्रेरणादायी कार्यशाळा

यशस्वी माणसांमध्ये असे नेमके कोणते गुणधर्म असतात जे त्यांनी मिळवलेल्या यशासाठी कारणीभुत असतात? जाणुन घ्या आणि उत्तुंग यश मिळवण्यासाठी स्वत:ला घडवा... सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा!

पहा जबरदस्त प्रेरणादायी व्हिडी



मित्रांनो, आपल्यापैकी बर्‍याच व्यक्तींना यशस्वी माणसांबद्दल प्रश्न पडतात....
  • यशस्वी माणसांमध्ये असे नेमके काय असते, ज्यामुळे ते यश संपादन करतात?
  • सर्व यशस्वी माणसांमध्ये कोणत्या गोष्टी समान असतात?
  • इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांच्यात येते कूठून?
  • इतरांपेक्षा काय वेगळेपण त्यांच्यात असते?
  • आपली स्वप्नं साकार करण्याच्या दिशेने सातत्याने कॄती करण्यास त्यांना कूठून प्रेरणा मिळते?
  • आपल्या क्षमतांचा पुरेपुर वापर ते कोणत्या गुणांमुळे करतात?

वरील प्रश्नांचे उत्तर एका वाक्यात देणे अशक्य आहे. यशस्वी होण्यासाठी नक्कीच भरपुर गुण आपण स्वतःमध्ये अंगिकारले पाहीजेत. परंतु यशस्वी माणसांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की यशस्वी माणसांच्या व्यक्तीमत्वामध्ये सात मुलभुत गुणधर्म असतात. ह्या सात मुलभुत गुणधर्मांना कळत- नकळतपणे यशस्वी व्यक्तींव्दारे जोपासले गेल्यामुळे त्यांनी जगात आपले अव्दीतीय स्थान निर्माण केले. ह्या सात मुलभुत गुणधर्मांना सतत खतपाणी घातल्याने ते पेटून उठतात व उत्तरोत्तर यशस्वी होतात.

हे सात मुलभुत गुणधर्म आपणही स्वतःमध्ये अंगिकारुन जोपासु शकतो आणि त्यांचा विकास करु शकतो. 'सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा!' या बॉर्न टू विनच्या जबरदस्त प्रेरणादायी कार्यशाळेत आपण हेच जाणुन घ्याल व यशस्वी होण्यासाठी सज्ज व्हाल!



हि कार्यशाळा कोणासाठी?
  • उद्योजक किंवा प्रोफेशनल्स
  • स्वयंरोजगारकर्ते किंवा नोकरदार
  • गृहीणी किंवा विद्यार्थी
  • लिडर किंवा मॅनेजर


दिनांक: गुरुवार,१० जुलै २०१४

वेळ: दुपारी ३ वाजता

स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)

गुंतवणुक रु.: १२००/-, १०००/-, ८००/-

प्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ९६१९४६५६८९, ७६६६४२६६५४

12 June 2014

जागवा आपल्यातील नेतृत्व

जागवा आपल्यातील नेतृत्व
सी. ई. पोतनीस, सकाळ, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
नेतृत्व ही नैसर्गिक देणगी आहेकी आत्मसात करता येणारं कौशल्ययाविषयी बहुतेकांचं दुमत आहे. तरीही साधारणपणे नेतृत्व ही नैसर्गिक देणगी आहेअसेच अनेकांचं मत असतं. खरं तर नेतृत्व आणि व्यवस्थापन हे गुण प्रत्येक व्यक्तीत उपजतच असतात. नेतृत्व व व्यवस्थापन हे गुण म्हणण्यापेक्षा नैसर्गिक गरज म्हणणंच रास्त ठरेल. या भौतिक जगात जगण्याकरता व पुढं जाण्याकरता काही मूलभूत साधनांचीगुणांचीकौशल्यांची गरज असते. ही सर्व साधनं परमेश्‍वरानं आपल्याला उपलब्ध करून दिलेली असतात. नेतृत्व व व्यवस्थापन हेही असंच मूलभूत साधन आपणा सर्वांकडं असतंच. आपल्यात नेतृत्वाचे व व्यवस्थापनाचे गुण आहेतही जाणीव अन्‌ विश्‍वास आपल्याला नसतो. त्यामुळंच नेतृत्व हे काही मोजक्‍या जणांसाठीच आहेही सर्वसाधारण धारणा असतेतसेच नेतृत्व अन्‌ व्यवस्थापन ही केवळ व्यवसाय/ सामाजिक क्षेत्रात अधिकारपदावर असलेल्या लोकांचीच गरज आहेअसाही समज आहे. या धारणेमुळं आपल्यातल्या नेतृत्वाविषयीच्या अन्‌ व्यवस्थापनाविषयीच्या गुणांकडं लक्षही दिलं जात नाही.


मानवानं अनेक शोध लावले. शोधच (Discovery) म्हणता येईलनवशोध (Invention) म्हणता येणार नाही. कारण निसर्ग म्हणजेच विपुलता व उपलब्धता. निसर्गात सर्वच आहे. मानवानं केवळ आहे त्या वस्तूंची जोडणी करूनमांडणी बदलून नवीन वस्तू शोधून काढल्या. हेच नेमकं आपल्याबाबतही लागू आहे. आपणही गुण-कौशल्यांची खाण आहोत. आपल्यातही विपुलता व उपलब्धता आहे. आपल्यात असलेले गुण आपल्याला शोधून काढायचे आहेत. त्या गुणांची जोडणीमांडणी करून नवीन कसबकौशल्य निर्माण करायचं आहे. नेतृत्वव्यवस्थापनाचं कसब हे अशातलंच एक आहे. आपण प्रत्येक जण ते वापरतही असतो. हे अर्थात नकळत,अजाणतेपणानंक्वचित व अपघातानं वापरलं जातं. तसंच ते बहुधा सुप्तावस्थेत असतं.

व्यवसायनोकरीसामाजिक क्षेत्रांत जेव्हा कामाचा व्याप मोठा व हाताखाली काम करणारे सहकारी असतातफक्त तेव्हाच नेतृत्व आणि व्यवस्थापन आवश्‍यक असतंअशीच बहुतेकांची समजूत असते. अशा वेळी नेतृत्वाची खरी कसोटी लागतेयाबाबत शंकाच नाहीपरंतु हे सर्व काही नसतानाही नेतृत्व आणि व्यवस्थापनाची गरज असतेचहे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण स्वतःपुरतंच मर्यादित काम करत असतोतेव्हाही या गुणांचा वापर होत असतो वा होणं अपेक्षित आहे. नेतृत्व काही केवळ हाताखाली किंवा समवेत सहकारी असतानाच होतंअसं नाही. स्वतःचं स्वतःकरता नेतृत्व आणि व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे. याची खरी सुरवात तर वैयक्तिक पातळीवरच होत असतेतसेच स्वतःकरताचं व्यवस्थापनही गरजेचं आहे. प्रथम नेतृत्व अन्‌ व्यवस्थापनातला फरक समजून घेऊया. नेतृत्व म्हणजे ध्येय ठरवणंदूरदृष्टी असणंदिशा देणंप्रोत्साहित करणं,विश्‍वास संपादन करणं व उंचावणंइत्यादी. व्यवस्थापन म्हणजे ठरवलेल्या ध्येयाकडं आखलेल्या दिशेनं कूच करणं. यात योजनावेळेचं नियोजनकामाची आखणीअसलेल्या साधनांचा परिणामकारक वापर करणं इत्यादी गोष्टी येतात. विचार केल्यास लक्षात येईलकी हे सर्व स्वतःलाही लागू आहे. चांगल्या नेतृत्वाशिवाय आणि व्यवस्थापनाशिवाय चांगलं आयुष्य जगणं अशक्‍यच आहे. त्यामुळंच विद्यार्थीगृहिणीनोकरदारव्यावसायिक अशा सर्वांनाच आपल्यातलं नेतृत्व शोधणं आवश्‍यक आहे. आपल्या आयुष्याला ध्येय हवंदिशा हवीस्वतःला प्रोत्साहित ठेवता गरजेचं आहे. त्याशिवाय योजना व वेळेचं नियोजनइत्यादीही साधता आलं पाहिजेहेच तर स्वतःचं नेतृत्व व व्यवस्थापन.

आपण प्रत्येकजण हे गुण वापरत असतोच. त्यांचा आवाका कमी-जास्त असतो. त्यात सातत्य नसतं. बऱ्याचदा त्यांचा वापर नकळतच होतो. संकटातअतिमहत्त्वाच्या प्रसंगीअचानक जबाबदारी पडल्यावर हे सुप्त गुण जागृत झाल्याचं आढळतंअशी अनेक यशस्वी उदाहरणं आपल्या पाहण्यात असतील. असंच एक उदाहरण म्हणजे मदर तेरेसा यांचं. कॅथॉलिक शाळेत शिकवणारी ही संन्यासिनी. मुख्याध्यापिका होऊन शाळेचं नेतृत्व आपल्याला करता येईलयाचा विश्‍वासही नसलेली ही संन्यासिनीपरंतु गरिबातल्या गरिबांच्या दारिद्र्यानं आणि दुःखानं ती हेलावली. त्यातूनच नेतृत्व जागृत झालं. प्रेमाच्या झऱ्यानं आणि नेतृत्वाच्या आधारानं तिनं उभारलेली संस्था जगभरात सर्वत्र सेवा पोचवत आहे.

आपण प्रत्येक जण काही ना काही तरी निर्णय घेत असतोनिवड करत असतोएक दिशा ठरवत असतोत्या मार्गानं चालत असतो. समस्या एवढीच आहेकी हे सगळं आपण अजाणतेपणाच्या अवस्थेतून करत असतो. नेतृत्वासारख्या अन्‌ व्यवस्थापनासारख्या गुणांना आपण आकार दिलेला नसतो. जाणीवपूर्वक त्या गुणांना जोपासलेलं नसतं. त्यामुळं अपघातानंच व क्वचित या गुणांची चुणूकही आपल्याला जाणवते. सराव नसलेला खेळ खेळताना अचानक आपल्याकडून एखादी सुंदर खेळी होते! ती चुकूनम्हणजेच अपघातानंघडलेली असते. आपल्यातली ही खेळी वारंवार व आपल्याला हवी तेव्हा होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. या जाणीवपूर्वक व सततच्या प्रयत्नांतूनच हे कौशल्यकसब निर्माण होतं व कायमस्वरूपी साथ देतं. त्यानंतर अपघातानंच नव्हेतर ठरवून हवा तो परिणाम घडवून आणता येतोतसंच नेतृत्व अन्‌ व्यवस्थापन हे जाणिवेच्या पातळीवरच घडवणं आवश्‍यक असतं.

व्यावसायिकसामाजिक आदी क्षेत्रांतल्या नेतृत्वाची व्याप्ती जास्त असते. त्यात इतरांना दिशा देणंप्रोत्साहित ठेवणं आदींची जबाबदारीही आपल्यावर असते. या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी तशी आवड तर हवीचपण त्यासाठी मोठी तयारीही हवी. वैयक्तिक नेतृत्व व व्यवस्थापनावर पकड असल्याशिवाय इतरांचं नेतृत्व करणं व इतरांचं व्यवस्थापन सांभाळणं अशक्‍यच. दुर्दैवानं अनेक जण अशा नेतृत्वात तयारीविना पडलेले असतात. नोकरीमधल्या काही वर्षांचा अनुभव काहींना ओघानं त्यात नेतो. मागच्या काही वर्षांतलं यश हे नेतृत्वातही यश देईलहा अत्यंत चुकीचा समज. यात यश मिळवण्यासाठी बरीच तयारी लागते. खरं तर आपल्यातलं नेतृत्व आधी विकसित होऊन नंतरच तसं पद मिळावं. लोक पदाच्या मागं असतातपण नेतृत्व व व्यवस्थापन विकसित करण्यावर त्यांचं लक्ष नसतं. त्यामुळंच या पदांवर अनेकांची केविलवाणी अवस्था होते. हाताखाली सहकारी असतातपरंतु नेतृत्वाचा अभाव असतो. असं नेतृत्व संस्थेचंतसंच सहकाऱ्यांचंही नुकसान करतं.

व्यावसायिकसामाजिक इत्यादी क्षेत्रांत नेतृत्व करायचं की नाहीहा प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा प्रश्‍न. प्रत्येकानं या दिशेला वळलं पाहिजे असंही नाहीपरंतु अशा नेतृत्वाची जर महत्त्वाकांक्षा असेलतर सर्वप्रथम स्वतःसंदर्भात काम करणं गरजेचं आहे. वैयक्तिक पातळीवर नेतृत्वावर आणि व्यवस्थापनावर पकड असलीच पाहिजे. स्वतःला दिशा नसेल तर दुसऱ्यांना काय दिशा देणारस्वतःला ध्येय नसेल तर इतरांच्या ध्येयपूर्तीला काय मदत करणारस्वतःचं नियोजन करता येत नसेलतर इतरांना व्यवस्थापन काय शिकवणारस्वतःला प्रोत्साहित ठेवता येत नसेल तर इतरांना काय प्रोत्साहन देणारअशा नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा नसली तरी केवळ आपल्यासाठीही हे गुण विकसित करणं गरजेचं आहे. स्वतःचं स्वतःवरचं नेतृत्व व व्यवस्थापन आपल्या जीवनाला हेतू देतं. सर्वांगीण विकास घडवतं. यातूनच आपलं जीवन खुलतं-फुलतं.

नेतृत्व विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. निर्णय घेण्यानंच निर्णयशक्ती वाढते. प्रत्येक निर्णयाच्या परिणामातून जाणीवपूर्वक शिकता येतं. त्यातूनच योग्य निर्णय घेण्याची तयारी होते. ध्येयनिश्‍चितीस्वतःवरचा विश्‍वासवेळेचं नियोजन यावर काम करावं. प्राधान्य कशाला द्यावं हे जाणीवपूर्वक ठरवणं गरजेचं आहे. सातत्यानं या गोष्टींचा जाणीवपूर्वक सराव केल्यास नेतृत्व व व्यवस्थापन विकसित झाल्याखेरीज राहणार नाही. इतरांबरोबरच्या नेतृत्वामध्ये प्रामाणिकपणा व विश्‍वासार्हता याला सर्वांत अधिक महत्त्व आहेहे जाणावं. स्वतःपेक्षा दुसऱ्यांचं हित महत्त्वाचंहा नेतृत्वातला महत्त्वाचा गुण. याच्याशिवाय आपण खरं नेतृत्व देऊ शकणार नाहीहे ध्यानी ठेवावं. जबाबदारी घेणं हादेखील नेतृत्वातील एक महत्त्वाचा गुण. आपल्या आयुष्याची जबाबदारी ही केवळ आपलीच. आपल्यातलं नेतृत्व जागवाजीवनाला दिशा द्या. जीवन घडवा.


Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites