April 2011 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

13 April 2011

पुस्तका बाहेरील जग दाखवणारी शाळा




जन्माला आलेलं प्रत्येक मुल हे लिओनार्दो दा विंची अथवा आईनस्टाईन यांच्या इतकेच प्रभावशाली असते. आपणास कदाचीत अविश्वसनिय वाटेल परंतु ही गोष्ट संशोधनाअंती सिद्ध झाली आहे. आपली चुकिची शिक्षणपद्धती, चाकोरीबद्ध विचारशैली त्याच्या वाढीच्या प्राथमिक वर्षात त्याचे केवळ खच्चीकरण करीत असते.


 
  
 
"सारी उम्र हम, मरमरके जी लिये;
एक पल तो अब हमें जीने दो.. जीने दो!
Give me some sunshine, give me some rain!
Give me another chance wanna grow up once again!"

नुकत्याच गाजलेल्या 'थ्री इडीयटस्' चित्रपटातील हे गाणं पाहताना आजच्या युवा पिढीच्या दयनीय अवस्थेला अनूभवून जीव कासाविस होतो. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर असलेले प्रचंड दडपण, पालकांच्या अपेक्षा, जीवघेणी स्पर्धा, गोंधळात टाकणारी अ‍ॅडमिशन पध्दत, शैक्षणिक संस्थांचे व्यावसायिकीकरण व भविष्याबाबतची अनिश्चितता असे आजचे विदारक चित्र युवा पिढीसमोर खुप मोठे प्रश्नचिंन्ह निर्माण करते. कोवळ्या वयामध्ये ह्या सर्व बाबींना तोंड देण्यासाठी आजची युवा पिढी खरोखरच मानसिक व बौधिकरित्या तेवढी सक्षम आहे का? बहूतेक नाही. गेल्या वर्षभरातील विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेता हे आपण मान्य केलेच पाहीजे. खास करुन दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे व परीक्षेचे एवढे जबरदस्त दडपण निर्माण होते कि ह्या मुलांचे संपुर्ण भविष्य त्यांनी परिक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबुन असते हे गृहीतच धरण्यात येते. ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी भविष्यामध्ये आपले करियर करणार आहे त्याचा निर्णय हा सर्वस्वी त्याने परीक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबून असतो. विद्यार्थ्याची कोणत्या क्षेत्रात आवड आहे? विद्यार्थ्याकडे कोणत्या विषयात योग्यता व कौशल्ये आहेत? त्याची भविष्याबद्दलची संकल्पना काय आहे? विद्यार्थ्याला काय बनायला आवडेल? ह्या प्रश्नांचा बहूतांशपणे विचार केला जात नाही. आपल्या मुलाने किंवा मुलीने डॉक्टर अथवा इंजिनीयर झालं पाहीजे असा बहूतांश पालकांचा आग्रह असतो. हे कितपत योग्य आहे? खरेतर विद्यार्थ्याला सुध्दा त्याचा स्वतःचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे कोवळ्या वयात सांगणे कठीणच असते, त्याचे कारण म्हणजे माहीतीचा व कौशल्य प्रदान शिक्षणाचा अभाव. रट्टा मारुन कोणत्या क्षेत्रात आपल्याला रस आहे हे कसे कळणार?



हे सगळं आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत, आणि दुर्दैव हे कि आपण सगळे कळत-नकळत या चुकिच्या यंत्रणेचे भाग झालेलो आहोत. आज आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आक्रमक व आमुलाग्र अश्या बदलांची गरज आहे. आपल्याला आपल्या भावी पिढीला मानसिक व बौधिकरित्या सबळ बनवायचे असेल तर पुस्तकी ज्ञानाला व मार्कांना महत्त्व न देता त्यांची कौशल्ये व प्रवृत्ती या दोन महत्त्वाच्या अंगांवर काम करणे गरजेचे आहे. परंतु दुर्दैवाने ७५% पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान शिक्षण जाणिवपुर्वकरित्या पुरवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची आवड्-निवड कळणे कठीण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात करियर निवडण्याबाबतचा गोंधळ नेहमीच जाणवतो.


आजच्या युवा पिढीची ही गरज लक्षात घेता बॉर्न टू विन ने तीन वर्षापुर्वीच फ्युचर पाठशाला ही कार्यशाळा राबवायला सुरुवात केली. उन्हाळी सुट्टीदरम्यान विद्यार्थ्यांना फ्युचर पाठशालाच्या कार्यशाळेद्वारे त्यांचे ध्येय ठरविण्यास मदत करणे, त्यांच्यातील सुप्त शक्तिचा ठाव घेण्यास मदत करणे, त्यांच्यात प्रवृत्तीमय बदल घडवून आणणे व आवश्यक तत्वांचे  व कौशल्यांचे परिणामकारक प्रशिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतु. फ्युचर पाठशाला प्रशिक्षणक्रमाद्वारे आत्तापर्यंत मुंबईभरातुन १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षित झाले असुन ह्या उन्हाळी सुट्टीमध्ये देखिल ही कार्यशाळा मुंबईमध्ये दादर, बोरीवली, विरार, बोईसर, चेंबुर, वाशी व खारघर येथे व नाशिकमध्येसुध्दा  राबवण्यात येणार आहे.

फ्युचर पाठशालाची अधिक माहीती देणारे एक खास सेमिनार दिनांक २१, २२, २४, २५, २६ व २७ एप्रिल व ३ मे रोजी अनुक्रमे चेंबुर, खारघर, बोरीवली, बोईसर, विरार, वाशी व नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहेत. बॉर्न टू विनचे संस्थापक व संचालक अतुल राजोळी स्वतः या सेमिनारचे प्रमुख वक्ते असुन ते युवा पिढीच्या समोर असणार्‍या आव्हानांबद्दल व फ्युचर पाठशालाबद्दल सविस्तरपणे माहीती देणार आहेत. ह्या सेमिनारला विद्यार्थी व पालकांना एकत्रितपणे मोफत प्रवेश देण्यात येईल. अधिक माहीतीकरिता संपर्कः 9619465689, 7666426654, 22939375/6/7/8, http://www.born2win.in/

01 April 2011

जगण्यातील चांगुलपणावरचा विश्वास “सुदृढ” करणारी मुलाखत!

“लोक सतत माझ्यामागे ऊभे राहिले. भांडवल कमी पडायचे तेव्हा पैसे मिळत गेले, जागेसाठी लोकांनी मदत केली. व्यायामाचा प्रसार हाच माझा ध्यास होता, माझा हेतू चांगला होता, मी स्वत: माझ्या स्पर्धकानांही मदत करतो, त्यातून मला आनंद मिळतो. मला जे मिळत गेले, ते मी इतरांना देतो, ते माझे कर्तव्य समजतो”, तळवलकर जिमचे संस्थापक मधुकर तळवलकर यांचे हे उद्गार. “बॉर्न२विन” संस्थेचा लक्ष्यसिध्दी सोहळा २८/२/११ला झोकात साजरा झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. मागील वर्षी तळवलकर जिमने शेअरबाजारात आपले शेअर विकायला काढले, १०० कोटी रुपयांचा हा छोटा आयपीओ. पण भरणा झाला ४,००० कोटी रुपयांचा आणि दक्षिण-उत्तर भारतातूनही लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. लोकांचा हा विश्वास बघून मधुकर सरांचे मन इतके हेलावले, ते भावनाविवश झाले व एका खोलीत जाऊन त्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. तळवलकर हा असा मोठा ब्रॅन्ड झाला, त्याची सुरवात झाली, १९६२पासून. हा प्रवास उलगडत गेला बॉर्न२विनचे संचालक अतुल राजोळी यांनी मधुकर सरांच्या घेतलेल्या मुलाखतीतून. सरांच्या वडिलांच्या व्यायाम शाळा होत्या. सरांनी जिम काढायचे ठरवले तेव्हा तळवलकर जिम या वेगळ्या नावाने त्या सुरू केल्या. त्याकाळीसुध्दा त्यांच्याकडे धर्मेंद्र, माला सिन्हा असे कलाकार सभासद होतेच, पण दारासिंग हे नावाजलेले कुस्तीवीरही त्यांचे सभासद होते. एक जिम सुरू केल्यावर वडिल सरांना म्हणाले, तुझ्या धाकट्या तीन भावंडांसाठी आणखी जिम सुरू कर. सर स्वत: टेक्सटाईल इंजिनिअर. त्यांनी खटाऊ मिलमध्ये काही काळ नोकरी केली. जिम व्यवसायात त्यांच्या ज्ञानाचा त्यांना लाभ मिळाला. विशेषत: जिमसाठी लागणार्‍या उपकरणांची निर्मीती करताना तर ते ज्ञान फारच कामात आले. आज तळवलकरांची अंगदला उपकरण निर्मीतीची ६००० फुटांची फॅक्टरी आहे.

अनेक वर्षांपूर्वी ते जिमसाठी कर्ज मागायला बॅंकेत गेले तेव्हा मॅनेजर म्हणाले, जिम ही इंडस्ट्री नाही किंवा तुम्ही शेतकरीही नाही आहात. तुम्हाला कर्ज मिळणार नाही. आज मात्र यालाच “फिटनेस इंडस्ट्री” म्हणतात व या उद्योगाचे तळवलकर हे प्रणेते- पायोनिअर. देशात अनेक ठिकाणी त्यांच्या जिम आहेत. त्यात अमृतसर इथे त्यांची जिम ही मला विशेष बाब वाटते. पंजाबी हे लोक धट्टेकट्टे- सुदृढ, तर त्यांच्यासमोर मराठी माणूस दुबळा असा समज गैर आहे, हे दाखवणारी ही बाब. एक मराठी माणूस पंजाबी लोकांना व्यायामचे धडे देतो ही कल्पनाच विशेष वाटते!

शेवटी सरांनी सुत्र सांगितले, कुटुंबावर प्रेम करा, व्यायाम करा व सतत देत राहा, बी अ गिव्हर. चांगुलपणा करा, तुम्हाला त्याचा लाभ मिळेल, असे चांगुलपणावरचा विश्वास सुदृढ करणारी ही मुलाखत.

त्यांच्या हस्ते लक्ष्यवेध कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व चषक देण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते व त्यांनी मुलाखतीला मनमोकळी दाद दिली.


विशेष आभारः श्री. उदय कुलकर्णी

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites