इच्छाशक्तीमुळे तुमचे जग तुम्ही नक्कीच बदलू शकता! ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

23 June 2017

इच्छाशक्तीमुळे तुमचे जग तुम्ही नक्कीच बदलू शकता!

आपण आपली इच्छाशक्ती वाढवून आपल्या रोजच्या जगण्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो का? याचे उत्तर होय असे असेच आहे. त्यामुळे तुम्हाला जगताना सहजपणे प्रत्यक्षात आणता येऊ शकतात असे काही उपाय आज सांगणार आहे. हे उपाय तुमच्या जगण्यातील सवय बनून गेले तर आयुष्य बदलून जाईल.
ज्या-ज्यावेळी आपण आपल्या दिवसभराच्या नियोजनात सुधारणा करतो. म्हणजेच आपण स्वनियंत्रण ही संकल्पना प्रत्यक्षात जगत असतो. स्वतःवर जितके जास्त नियंत्रण म्हणजेच प्रबळ इच्छाशक्ती होय. छोटे बदल करण्यात आपण यशस्वी झालो तर मोठे ध्येय ठेवून ते साध्य करण्याची क्षमता आपण विकसित करु शकतो. ब्रश करणे, खाणे, दरवाजा उघडणे आदी कृती तुम्ही ज्या हाताने करता त्याच्या विरुध्द हाताने त्या करुन पाहा. सुरुवातीला अगदी विचित्र वाटेल पण, दिर्घकाळात त्यातून इच्छाशक्ती वाढण्यास मदत होईल.

मेंदूला ऊर्जा मिळणे आवश्यक : जेवणाच्या वेळा कधीही चुकवू नका. आपला मेंदू म्हणजे आपल्यासंदर्भात निर्णय घेणारा महत्त्वाचा अवयव आहे. त्याला अन्नद्रव्यांचा पुरेसा पुरवठा झाला आहे किंवा नाही यावरच त्याने योग्य निर्णय घ्यावा यासाठी आवश्यक ती जबरदस्त इच्छाशक्ती निर्माण होणार आहे. त्यामुळे रोज नियमित आणि वेळच्यावेळी जेवण करा. जेवणात आरोग्यदायी प्रोटीन्स, भाज्या यांचा समावेश असू द्या. पचनाला जड असणारे पदार्थ टाळा.


एकावेळी एकाच बदलावर लक्ष केंद्रीत करा : इच्छाशक्ती वाढवता येऊ शकते. ती दिर्घकालीन प्रक्रीया आहे. एखादे अवघड वाटणारे काम सरावाने आपल्याला सोपे वाटू लागते तसेच इच्छाशक्ती वाढवण्याच्या प्रक्रीयेचे आहे. आपल्याला एकदम एका दिवसात सगळा बदल करता येणार नाही. आपल्याला खरोखर झालेला बदल आणि त्यातील फायदे अनुभवायचे असतील तर सुरुवातीला छोट्या गोष्टीमध्ये बदल करा. एकावेळी एकच ध्येय ठेवा आणि ते साध्य करा.


प्रभावी सवयी आत्मसात करा : संशोधनातून हे सिध्द झाले आहे, की चांगल्या सवयीतून आपली इच्छाशक्ती बळकट होते. साधी गोष्ट आहे. रोज झोपताना बेडशीट बदलायचे आणि उठल्यावर पांघरुण घडी घालून ठेवायचे. यातून आपल्या इच्छाशक्तीवर जबरदस्त सकारात्मक परिणाम होतो. कारण छोट्या सवयींमधून स्वयंशिस्त आणि स्वनियंत्रण वाढते आणि ते शरीरात भिनते.

रोजच्या कामाचे व्यवस्थापन : आपली रोजची कामाची यादी असते. आपण विचार न करता उगाचच लांबलचक यादी बनवली आणि त्यातील अनेक कामे झाली नाहीत तर मग आपले मन आपल्याला खाते. मग प्रत्यक्ष काम करण्या ऐवजी आपण जास्त काळजी करु लागतो. आपला मूड खराब होतो. मग त्यातून आपण भावनिक बनतो आणि नको त्या गोष्टींच्या आहारी जातो. त्यासाठी दिवसअखेर जास्तीत जास्त कामे झालेली असतील अशा बेताने सकाळी कामाची यादि तयार करा.


कामातून ब्रेक घ्या :  स्वतःवर कायमस्वरुपी नियंत्रण ठेवणे अवघड असते. अनेकदा इच्छाशक्ती विसरुन आपण अयोग्य निर्णय घेतो. जर आपण अयोग्य निर्णय घेतो. जर आपण कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती आणि ब्रेक घेतला तर त्याचा फायदा होतो. बसल्याजागी दोन मिनिट डोळे मिटणे, तोंडात काही तरी टाकणे अर्थातच आरोग्यदायी, एक-दोन मिनिटांसाठी टीव्ही पाहणे आणि परत आपल्या जागेवर येऊन कामाला सुरुवात करण्यातून आपण ताजेतवाने होतो आणि इच्छाशक्तीचा वापर करुन चांगले काम करु शकतो.


आपण हे सगळं का करत आहोत?
आपल्या वागण्यात आपल्याला बदल का घडवून आणायचा आहे? आपल्याला काय साध्य करायचे आहे? आपण आपल्या चुकीच्या सवयी सोडल्या तर आपण काही गमावणार आहोत का? आपण सातत्याने या प्रश्नांच्या उत्तरांची स्वतःला आठवण करुन दिली तर आपण ठरवलेल्या निर्णयावर ठाम राहण्याबाबत आपली इच्छाशक्ती निश्चितपणे वाढलेली असेल. हे सगळे माझ्या जगण्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी करायचे आहे याची जाणिव स्वतःला सातत्याने करुन द्या.


सौजन्य: संध्यानंद

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites