LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

11 April 2017

यशाच्या शिखरावरही पूर्वीची दु:खस्थिती न विसरणारे 'अलिबाबचे' संस्थापक जॅक मा

जॅक मा यांच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशाच्या उंच शिखरावर पोहोचल्यावरही त्यांना त्यांच्या पूर्वीच्या दयनीय स्थितीचा विसर पडला नाही. त्यांच्या यशातून प्रेरणा घेणार्‍या कुणालाही प्रोत्साहन देण्यास ते कुचराई करत नाहीत.

जॅक माअलिबाबा समूहाचे संस्थापक२७.९ दशलक्ष डॉलर्सच्या साम्राज्यातून ते चीनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. मा यांना हे यश काही एका रात्रीत मिळालेले नाही. संघर्षपिळवणूक आणि मेहनत यांची परिसीमा गाठल्यानंतर ते येथे पोहोचले आहेत. त्यांच्या या यशामागे एक कहाणी आहे.

कदाचित अपयश आल्यावर त्यातून बाहेर पडण्याची जबरदस्त क्षमता त्यांच्यात असावी त्यामुळेच हे शक्य झाले. जॅक मा गरीब विद्यार्थी होते. बालपणीच मा यांना त्यांच्या प्राथमिक शाळेतील जीवनात दोनदा नापास व्हावे लागले, माध्यमिक परीक्षेत ते तीनदा नापास झाले, तर विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत हांगझोऊ सर्वसाधारण विद्यापीठात येण्यापूर्वी देखील तिनदा ते नापास झाले होते. या परिक्षेत तर त्यांना गणित विषयात एक टक्केपेक्षा कमी गुण मिळाले होते. अनेकदा त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते.


मा यांची जिद्द आणि चिकाटी यांचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे; कारण त्यांना सुमारे तीस वेळा वेगवेगळ्या कामांवरुन काढून टाकण्यात आले. मात्र ते नाराज न होता दुसरे काम शोधत राहिले. इतकेच काय, केएफसीमध्ये निवड झालेल्या २४ जणांमधून, हाकलून लावण्यात आलेले ते एकमेव होते. केवळ पाच उमेदवारांमधील ते एकजण होते ज्याची निवड पोलीसदलात झाली होती, मात्र तेथून काढून टाकण्यात आलेले ते एकमेव होते, कारण त्यांना सांगितले गेले की ते 'चांगले' नाहीत. हार्वर्डने त्यांना दहावेळा नाकारले. १९९९ मध्ये मा यांनी मित्रांच्या मदतीने अलिबाबाची स्थापना केली पण सिलिकॉन व्हॅलीला निधीसाठी गळ घातली नाही.

एका वेळी अलिबाबा दिवाळ्यात जाण्यापासून केवळ १८ महिने दूर होते. पहिली तीन वर्ष, अलिबाबाला काहीच महसूल मिळाला नाही. सप्टेंबर २०१४ मध्ये अलिबाबा सार्वजनिक कंपनी झाली. त्यातून ९२.७० डॉलर्सचे समभाग विकण्यात आले. असे करुन ती अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी आय. पी. ओ. ठरली.

सन २००९ मध्ये आणि २०१४ मध्ये मा यांचे नाव सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून 'टाइम' नियतकालिकात झळकले होते. बिझनेस विकमध्ये चीनमधील सर्वांत शक्तीवान व्यक्ती म्हणून त्यांची निवड झाली. फोर्बच्या मुखपृष्ठावर देखील त्याची छबी चीनमधील पहिला मुख्य प्रवाहातील उद्योजक म्हणून झळकली आहे. जॅक मा यांच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशाच्या उंच शिखरावर पोहोचल्यावरही त्यांना त्यांच्या पूर्वीच्या दयनीय स्थितीचा विसर पडला नाही. त्यांच्या यशातून प्रेरणा घेणार्‍या कुणालाही प्रोत्साहन देण्यास ते कुचराई करत नाहीत, त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, तुम्ही जर काही त्याग केला नसेल तर तुम्हाला अजूनही संधी आहे, तसे करता न येणे हे मोठे अपयश आहे.

सौजन्य: संध्यानंद

29 March 2017

जगातील आठ अब्जाधीशांच्या यशाचं सूत्र!

बिल गेट्स, अमानसिओ ऑर्टेगा, वॉरेन बफे, कार्लोस स्लिम, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग, लॉरेन्स एलिसन आणि मायकल ब्लूमबर्ग ही जगातील आठ सर्वांत श्रीमंत लोक आहेत. लक किंवा चान्स मिळाल्यामुळे ते जगश्रीमंत अब्जाधीश बनलेले नाहीत. कठोर मेहनत, शिस्त, परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची लवचीकता यांसारख्या अनेक अंगभूत गुणांचा वापर करुन ते जगश्रीमंत बनलेले आहेत. त्यांचे विचार नक्कीच आत्मसात करण्यासारखे आहेत.

अमानसिओ ऑर्टेगा
संस्थापक आणि माजी चेअरमन - इंडिटेक्स

एकूण संपत्ती- ४ लाख ५६ हजार ६०५ कोटी रुपये.
सूत्र: समाधानी राहू नका, अधिकासाठी प्रयत्न करा.
अमानसिओ ऑर्टेगा म्हणतात - 'जी व्यक्ती स्वतःसंदर्भात पूर्ण समाधानी असते, आता आपल्याला काही करायचं बाकी नाही असं तिला वाटतं तेव्हा हा विचार सर्वात वाईट असतो. प्रगती करा, मोठे व्हा नाहीतर मरुन जा'. आज 'अमानसिओ ऑर्टेगा' हे स्वतःला अजिबात समाधानी ठेवत नाहीत किंवा राहू देत नाहीत. कायम कल्पकता वापरुन नव्या गोष्टी साध्य करण्याचा त्यांचा स्वभाव आहे.


बिल गेट्स
संस्थापक आणि माजी सीईओ - मायक्रोसॉफ्ट

एकूण संपत्ती- ५ लाख ११ हजार १२५ कोटी रुपये. 
सूत्र: केवळ ध्येयावर लक्ष केंद्रीत करा.
स्पष्ट ध्येय आणि ते साध्य करण्यासाठी कठोर मेहनत यावर बिल गेट्स यांचा पूर्ण विश्चास आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या सगळ्या प्रक्रियेत उद्दिष्ट नजरेच्या टप्प्यात येण्यासाठी योग्य उपायही करावे लागतात. योग्य उद्दिष्ट निश्चित करणं आणि ते साध्य होईपर्यंत कठोर मेहनत करणं हे बिल गेट्स यांचं वैशिष्ट्य आहे आणि हाच त्यांचा जिनिअसनेस आहे.


जेफ बेझोस
फाऊंडर, चेअरमन - अ‍ॅमेझॉन डॉट कॉम

एकूण संपत्ती- ३ लाख ०८ हजार ०३८ कोटी रुपये. 
सूत्र: अपयशाची भीती झुगारा.
यश मिळवायचं तर अपयशी होण्याचं धाडस असायलाच हवं असं बेझोस म्हणतात. ते अपयशाचा विचार न करता नवे प्रयोग करतात. अपयशाकडे ते संधी म्हणून बघतात आणि त्या अपयशातला अनूभव हे स्वतःच्या सुधारणेसाठी वापरतात. इन्संट सक्सेस हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही.


मार्क झुकरबर्ग
सहसंस्थापक, चेअरमन आणि सीईओ- फेसबूक

एकूण संपत्ती- ३ लाख ०३ हजार ९४९ कोटी रुपये. 
सूत्र: प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण नको.
ज्यावेळी टीका होते तेव्हा झुकरबर्गची प्रतिक्रीया आणि कृती तात्काळ होते. परिस्थितीप्रमाणे तो बदल आत्मसात करतो. आज फेसबुकचा चेहरामोहरा दर दिवशी बदलत आहे; पण त्यात त्याचा सहभाग असतोच असं नाही. त्याच्या या भूमिकेमुळे युझर्सच्या प्रतिसाद आणि प्रतिक्रियांवर फेसबुक दर दिवशी नव्याने आकाराला येत असतं.  

लॉरेन्स एलिसन
सहसंस्थापक आणि पूर्वीचे सीईओ ओरॅकल कॉर्पोरेशन

एकूण संपत्ती- २ लाख ९७ हजार १३४ कोटी रुपये. 
सूत्र: जोखीम स्वीकारा
जोखिम घेतल्याशिवाय यश मिळू शकत नाही यावर एलिसन यांचा पूर्ण विश्चास आहे. जोखीम घेण्याची भीती वाटत असल्याने लोक काही नवं करत नाहीत आणि जे स्वतःला जोखीमीत झोकून देतात ते यशाच्या कळसावर जाण्याची शक्यता सर्वात जास्त असते.


वॉरेन बफे
इनव्हेस्टर अँड सीएओ - बर्कशायर हाथवे

एकूण संपत्ती- ४ लाख १४ हजार ३५२ कोटी रुपये. 
सूत्र: स्वतःच्या कौशल्यात पूर्ण प्राविण्य मिळवा.
वॉरेन बफे यांचं गुंतवणूक करण्याचं धोरण हे जुन्या वळणाचं आणि कंटाळवाणं समजलं जातं कारण या गुंतवणुकीचे फायदे मिळायला अनेक वर्षे लागतात; पण तरीही ते स्वतःचं धोरण कोणत्याही कारणावरुन बदलत नाहीत. त्यांचा जो दृष्टीकोन असतो, त्याविषयी ते पूर्ण ठाम असतात आणि आपल्या निर्णयावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. यामुळे आज वॉरेन बफे हे जगातील सर्वात जास्त यशस्वी गुंतवणूकदार ठरले आहेत.


मायकल ब्लूमबर्ग
संस्थापक आणि सीईओ- ब्लूमबर्ग एलपी

एकूण संपत्ती- २ लाख ७२ हजार ६०० कोटी रुपये.
सूत्र: आत्मविश्वासाने सामोरं जा.
ज्यावेळी ब्लूमबर्ग यांच्यासमोर आव्हान उभं राहतं तेव्हा ते त्या आव्हानाला पूर्ण तयारीने आणि आत्मविश्वासाने सामोरं जातात. आपल्या सहकार्‍यांचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढवण्याची अद्भुत क्षमता त्यांच्यात आहे. एक लिडर म्हणून ते इतरांनाही त्यांच्या आव्हानात्मक परिस्थितीला समोर जाण्यासाठी बळ देतात.

कार्लोस स्मिल
संस्थापक- ग्रुपो कार्सो आणि मेक्सिको

एकूण संपत्ती- ३ लाख ४० हजार ७५० कोटी रुपये.
सूत्र: साधेपणावर भर.
कार्लोस स्मिल हे जगातील अतिशय साधे श्रीमंत व्यक्ती आहेत. ते साध्या घरात राहतात आणि कुठे जायचं असेल तर ते स्वतः कार ड्राईव्ह करतात. मिळवलेली संपत्ती ते स्वतःवर खर्च करण्या ऐवजी परत स्वतःच्या बिझनेसमध्ये गुंतवतात. त्यांच्यामध्ये गुंतवणूक ही  बाग आहे जी सतत फुलवावी लागते.

सौजन्य: संध्यानंद

06 March 2017

मुलांशी निखळ मैत्री करा

आई वडील म्हणून आपल्या मुलांवर कधीही कुठलीही गोष्ट थोपवू नका. तुमचे त्यांच्यावर प्रेम आहेच पण त्यांचा आदर करायला शिका. प्रेमात आणि आदर करण्यात फरक असतो. प्रेमात आपण कधीकधी जास्त भावनिक आणि हळवे होत आपल्याच मुलांना त्रासदायक ठरु शकतो; पण आदरात मात्र तसे होत नाही. आदर केल्यामुळे आपले मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे याची समज तुम्हाला येते. हे ही लक्षात असू द्या की प्रेमातूनच आदराची वाट जात असते ज्यातून तुम्ही मुलांशी निखळ मैत्री करु शकता.


हे करा.

१) तुमच्या मुलांच्या मित्र मैत्रीणींशी देखील दोस्ती करा. त्यांच्या सोबत खेळा. त्यांना काहीतरी मजेदार काम करायला सांगा. त्यांची कंपनी मनापासून एन्जॉय करा.

२) मुलांवर संस्कार करताना, त्याविषयी बोलत असतांना त्यांची भाषा वापरा. बोजड भाषा वापरु नका. तुम्ही ज्या मुल्यांविषयी त्यांच्याशी बोलणार आहात ते तुमच्या स्वतःच्या वागण्यात आहेत ना हे आधी पाहून घ्या.


३) मुलांशी खोटे बोलू नका.


४) आपली मुले काय विचार करतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी ते जेंव्हा तुमच्याशी बोलत आहेत, मग ती साधी गोष्ट असली तरी ती मन लावून ऐका.


५) मुलाला किंवा मुलीला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ती समजून घ्या. त्यांची कुठलीच गोष्ट फालतू समजू नका. ती तुमच्या दृष्टीने कदचित फार महत्त्वाची नसेल पण त्यांच्यासाठी, त्यांच्या विचारांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची असू शकते.

६) त्यांच्या सोबत त्यांच्या आवडीचा सिनेमा पाहा. त्यावर त्यांच्याशी चर्चा करा.



७) मुलांना वेगवेगळे कलाप्रकार दाखवा. त्यातून त्यांना व्यक्त व्हायला शिकवा तुम्ही आणि तुमचे मूल मिळून एखादा कला प्रकार शिका.

८) आपल्या मुलांची तुलना सतत दुसर्‍या मुलांशी करु नका. मुलाचे मन दु़खावले जाईल, त्याचा अपमान होईल असे बोलू नका. चारचौघात तर अजिबातच तसे बोलू नका.

९) मुलांच्या सहवासाचा आनंद घ्या. तुमचे मुल तुमच्यात नक्की आनंद शोधेल.

सौजन्य: संध्यानंद

17 February 2017

उद्योजक होण्यास सध्याचा काळ अनुकूल.

स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा बहुतेक सगळ्यांची असते. हल्ली तर स्टार्टअपसाठी पोषक दिवस आहेत. सरकारची गुंतवणुकूसाठी, योजना आणि सवलतींसाठी उत्सुक आहे. पण स्वतःचा व्यवसाय सुरु करताना काही गोष्टींचे भान असणे गरजेचे आहे. तसेच काही कौशल्यांबद्दल जागरुकता असणे गरजेचे आहे.



१. कल्पकता/ सर्जनशिलता : कुठल्याही व्यवसायासाठी कल्पकता आवश्यक असते. वस्तू बनवण्यापासून ती विकण्यापर्यंत सगळ्या टप्प्यात कल्पकता उपयोगी पडू शकते. इतरांचे कॉपी करण्यापेक्षा स्वतःचा असा वेगळा ठसा कसा उमटवता येईल याचा विचार करा. तो जास्त यशस्वी होऊ शकतो.


२. वेळेचे भान : वेळेचे गणित अचूक असणे आवश्यक आहे. दिलेला शब्द, वेळ पाळणे आवश्यक आहे. कुठलाही व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन अचूक असेल तर निम्म्यहून अधिक अडचणी दूर होतात.


३. सुसंवाद : व्यवसायात ग्राहक, कच्चा माल विक्रेता, इतर व्यावसायिक यांच्याशी सुसंवाद असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे समस्या सोडवण्यासाठीचे उपाय सहज सापडू शकतात. आपण नवीन काम सुरु केलेले असताना सुसंवाद असेल तर बाजाराची अनेक गुपिते, कळीचे मुद्दे आपोआप समजतात. त्यासाठी वेगळे कष्ट घेण्याची गरज नसते.


४. सकारात्मक दृष्टीकोन : समस्येतून बाहेर पडण्यासाठी गरजेचे कौशल्य आहे. व्यवसाय म्हटलं की चढ आणि उतार आलाच . कधी नफा, तर कधी तोटा त्यामुळे दृष्टीकोन सकारात्मक असेल तर तोट्याच्या वेळीही त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होतात.

५. नियोजन / आयोजन : या कौशल्यांशिवाय व्यवसायात यशस्वी होता येऊ शकत नाही. कामाचे नियोजन नसेत तर व्यवसायाला शिस्त येत नाही. त्यातून गलथान कारभार सुरु होतो ज्यामुळे व्यवसाय बुडीत निघण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

६. विश्लेषण : आपल्या यशापयशाचे, आपण बनवलेल्या वस्तूंचे विश्लेषण करता आलेच पाहिजे. ते जमले की पाय आपोआप जमिनीवर राहतात.
७. गृहपाठ हवाच : एखादा विषय शोधणं त्याची माहिती गोळा करणं. समस्या सोडवता येणं. आजूबाजूला होणार्‍या बदलांवर नजर असणं. ते बद्द्ल स्वीकारण्याची तयारी असणं. सतत नवीन काही तरी शिकवण्याची उत्सुकता असणं. पुर्वतयारी आणि गृहपाठ करण्याची तयारी असणं. आपल्या कल्पना प्रभावीपणे मांडता येणं. आपल्याजवळ असणारी कौशल्ये आपल्याबरोबर इतरही लोकांनी आत्मसाद करावीत यासाठी प्रयत्नशिल असणं. या तुमच्याजवळ असतील तर उत्तमच पण नसतील तर ती तुम्ही विकसित करु शकता.

सौजन्य: संध्यानंद

बिझनेस सुरु करण्याआधी किंवा सुरु केल्यानंतर येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी व्यवसाय विकास क्षेत्रातील अग्रगण्य संस्था बॉर्न टू विन घेऊन येत आहे "मोफत काउंसिलींग"

फ्री काउंसिलिंगसाठी खालील फॉर्म भरा किंवा संपर्क करा: 7666426654

06 January 2017

स्वतःला बदला, जग बदलेल! - अतुल राजोळी

मित्रांनो नमस्कार,
जगातील एकमेव गोष्ट जी सदैव कायम असते ती म्हणजे 'बदल'. उदाहरणार्थ, आत्ता या क्षणी आपल्या शरीरात व पेशींमध्ये बदल होत आहेत. पृथ्वीच्या भौतिक अवस्थेत बदल होत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये, तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. आपण ज्या पध्दतीने काम करतो, संभाषण करतो त्यांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. दळणवळणांच्या साधनसामग्रीमध्ये बर्‍याच प्रमाणात बदल होत आहेत. आज जगात प्रचंड प्रमाणात मोठे बदल होत आहेत. परंतु या बदलाला काही लोक विरोध करतात. त्यांना त्यांच्या सभोवताली होत असलेले बदल मान्य नसतात, त्यांचा ते स्वीकार करत नाहीत. बदल न स्वीकारल्यामुळे अशा व्यक्तींना कालांतराने एवढा मोठा फटका बसतो की, त्यांचं अस्तित्वच नष्ट होतं. काही लोक बदलाचा विरोध जरी करत नसले तरी बदल आनंदाने स्वीकारतही नाहीत. ही माणसं सहनशील माणसं असतात. त्यांना त्यांच्यावर अत्याचार झाल्यासारखं वाटतं; परंतु त्यांना हेदेखील माहीत असतं की, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही व अनिवार्य असल्याकारणाने ते बदलाशी तडजोड करतात. बदल ते मनापासून स्वीकारत नाहीत. 'आलिया भोगासी असावे सादर' असं त्यांचं घोषवाक्य असतं.

फार थोडी माणसं झालेला बदल मोकळ्या मनाने स्वीकारतात. (कदाचित म्हणूनच यशस्वी माणसांची जगातील संख्यादेखील कमीच आहे!) जगात होत असलेल्या बदलाकडे ते सकारात्मक दृष्टीने पाहतात. या बदलांकडे भविष्यातील संधी या नजरेतून ते पाहतात. त्यांना हे कळून चुकलं असतं की, जगात होत असलेले बदल हे फक्त त्यांच्या बाबतीतच होत नाही आहेत, तर सर्वांबाबत होत आहेत; त्यामुळे या बदलांमध्ये नवीन संधीदेखील नक्कीच निर्माण होणार आहेत. या नविन संधींचा ते शोध घेतात व होत असलेला बदल आनंदाने साजरा करतात.

जगात होत असलेल्या बदलांना आपण मोकळ्या मनाने सामोरं गेलं पाहीजे, नाहीतर आपल्याला त्याची झळ लागल्याशिवाय राहणार नाही. काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवून न आणल्यामुळे कित्येक जुन्या कंपन्या कर्जबाजारी झाल्याची उदाहरणं आपल्याला माहिती असतीलच. काही वर्षांपूर्वी ज्या कंपन्या यशस्वी कंपन्या म्हणून जगाला माहिती होत्या त्यांतील काही कंपन्यांचं आज अस्तित्वच नष्ट झालं आहे. आपल्यासमोर अशाही बर्‍याच कंपन्यांची उदाहरणं आहेत, ज्यांनी माहिती-तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांच्या मदतीने अल्पावधीत उत्तुंग यश प्राप्त केलं.

आपल्या सभोवताली बदल तर नेहमीच होत राहणार आहेत. ते आपण रोखू शकत नाही. त्यांना विरोध करणं किंवा बदल होणारच नाहीत अशी अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणा आहे. जगात होत असलेल्या बदलांशी आपण जुळवून न घेता, स्वतःमध्ये योग्य ते बदल केले नाहीत, तर भविष्यात अशी वेळ येईल जेव्हा आपल्याला बदलण्याशिवाय पर्यायच उरला नसेल व तेव्हा तडजोड करावी लागेल. जर आपणास आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होणार्‍या संभाव्य बदलांची जाणीव असेल, तर आत्ताच त्याचा सकारात्मक पध्दतीने विचार करा, त्यातून मिळणार्‍या नवीन संधीचा शोध घ्या व होणारा बदल आनंदाने साजरा करा.

जगातील होणार्‍या बदलांशी जुळवून घेण्यासाठी आपण स्वतःमध्ये बदल करणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत आपण स्वतःच्या विचारांमध्ये, मनस्थितीमध्ये, वागणुकीमुळे, समजुतींमध्ये, सवयींमध्ये व कृतीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत नाही तो पर्यंत आपण या बदलत्या युगात नवीन काही साध्य करु शकत नाही. आजच्या गतिक व सतत बदलणार्‍या युगात यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे हवी THE SUCCESS BLUEPRINT.

THE SUCCESS BLUEPRINT म्हणजे काय?
  • आपल्या मानसिक शक्तीला जागृत करण्याची क्षमता.
  • आपल्या कडील अगाध सामर्थ्याची जाणिव असणे व वापरण्याची कुवत असणे.
  • आपल्या समजुती, प्रवृत्ती व कृतीव्दारे असाधारण उद्दीष्टे साध्य करण्याची गुरुकिल्ली.
  • आपल्या संपुर्ण आयुष्याचा ताबा घेणे आपल्यातील सर्वोत्कृष्ट क्षमतेचा ठाव घेणे.


आपणही स्वतः ला बदलू शकतो आणि आजच्या  बदलत्या  युगात यशस्वी होऊ शकतो. 
THE SUCCESS BLUEPRINT - एक अद्वितीय कार्यशाळा


प्रशिक्षक: अतुल राजोळी

दिनांक: १ फेब्रुवारी २०१७

वेळः सकाळी ९:३० ते संध्याकाळी  ६

स्थळः मैसुर असोसिएशन हॉल, भाऊ दाजी रोड, माटुंगा (पु.)

प्रवेशिका मिळवण्यासाठी संपर्कः 7666426654, 9619465689

नाव नोंदवण्यासाठी खालिल Form भरा:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites